ताज्या घडामोडी

प्रधानमंत्री जनजाती न्याय आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष व महाराजस्व अभियाना अंतर्गत धुंडेशिवणी, चांदाळा, मरेगाव येथे शिबीरांचे आयोजन

गडचिरोली, 14 जून २०२५ : भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JUGA) अंतर्गत दिनांक १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभरात विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली तालुक्यातील गावांमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मागील महिन्यात कोटगल पोर्ला येवली धुंदेशिवनी व पोटेगावं येथे अभियान राबविण्यात आले हे विशेष
दिनांक 17 जून धुंडेशिवनी, 19 जून चांदाळा, 24 जून मरेगावं येथे अनु जमाती व इतर नागरिकांसाठी शिबीराचे आयोजन केले आहे.
या शिबिरांचे उद्दिष्ट अनुसूचित जमातीच्या नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचविणे आणि या योजनांबाबत जनजागृती करणे हे आहे. शिबीरामध्ये खालील सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत :
नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती
मतदार ओळखपत्र काढणे व अद्ययावत करणे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळविणे, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड व सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी रेशन कार्ड बनविणे, बँक खाती उघडणे, वैयक्तिक वनहक्क दावे स्वीकारणे, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान कार्ड आणि किसान क्रेडीट कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज स्वीकारणे, वनधन विकास केंद्राशी संबंधित लाभ मिळवणे, सौर ऊर्जा व स्वयंपाक गॅस कनेक्शन मिळविणे, विमा योजनांची नोंदणी, सिकलसेल व अॅनेमिया तपासणी (आरोग्य विभागामार्फत)
या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सशक्तीकरणाला गती देण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून श्री संतोष आष्टीकर तहसीलदार गडचिरोली यांनी केले आहे.
०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button